Saturday, May 2, 2015

कविता

पानसरे आणि पुरंदरे

पर्वा जीवाची केली नाही
खरा शिवाजी राहिले सांगत ।
शिवचरित्राचं चलनी नाणं
जातवर्चस्वास्तव गेले उधळत ।।

राष्ट्रनिष्ठेचा विचार पेरती
कुळवाडीभूषणच छत्रपती ।
'गो-ब्रा'प्रतिपालकत्वाचा शिक्का
कोरु पाहती शिवरायांच्या माथी ।।

कष्टकर्‍यांच्या उत्थानासाठी
उपेक्षेचाही जहरी झेलला फंदा ।
अतिरंजकतेचे बेगड डकवून
शिवचरित्राचाही इथे केला धंदा ।।

भटी-सनातनी क्रूर विकृतीने
डाव साधला बंदूकीने, जीव घेऊन ।
होई उतराई आता नवपेशवाई
महाराष्ट्रभूषणचा सन्मान देऊन ।।

Friday, December 12, 2014

१) चिरफाड

        विकासाआडचा बजरंगी उच्छाद..!
..एकिकडे मोदीनीं विकासाचा मुखवटा पांघरला असता-
ना दुसरीकडे मोदींचे संघीसाथी मात्र देशाचा धर्मनिरपेक्ष-
तेला संपवण्यास सज्ज झाले आहेत.मोदी आणि संघा
दरम्यान जो छुपा करार,अजेंडा झाला आहे तो आता अशा
आगलाव्या साध्वी आणि साधू यांच्या मुखातून चांगलाच
बाहेर पडताना दिसतोय.उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा व
अलिगढ शहरात पार पडलेल्या व इतरत्र पार पडणार
असलेल्या घरवापसी सारख्या धर्मांतराच्या होलसेल
कार्यक्रमातूनही ते प्रत्ययास येते आहे.
                     मोदी स्वतःची जागतिक नेत्याची प्रतिमा
बनवण्याच्या कच्छपि लागले असताना देशात मात्र त्यांची
बजरंगी माकडे मात्र भगव्या उन्मादाने पछाडलेली,पिसाळ
लेली दिसत आहेत.सर्वसमावेशक परंपरेचा आणि आमच्या
धर्मनिरपेक्ष संविधानाचा खात्मा करु पाहणारी ही वामनी
अवलाद त्यात कधीच यशस्वी ठरणार नाही.विकासाच्या
मुद्यावर निवडून आलेल्या समस्त 'भाजपेयी'नीं सद्या जे
काही आक्रीत आरंभले आहे ना, त्याची देशातील जनता
अवश्य दखल घेत आहे.रेशीमबागेच्या चिथावणीने स्वैर
झालेली ,माणुसकीला गिळण्यास निघालेली  ही देशबुडवी
पिलावळ धार्मिक व सामाजिक दहशत निर्माण करु पाहते
आहे.
मात्र या देशातील मजबूत असलेली 'गंगा-जमनी' परंपरा
हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही.म्हणूनच युपी
मधील नंगानाच थांबवणे आता गरजेचे बनले आहे.मात्र
तेथील स्वतःला समाजवादी म्हणवणारी यादव पितापुत्राची
जोडगोळी सद्या करतेय तरी काय? हा प्रश्न पडावा इतके
तेथील शासनव्यवस्थेचा बोऱ्या वाजल्याचे जाणवत आहे
बांगलादेशी मुसलमान नागरिकांना नागरीसुविधांचे प्रलोभन
दाखवून घरवापसी चा हा तथाकथित घाट घातला गेलाय
जो हिंदुत्ववादी शक्तींचा भयावह मुखडाच दाखवतो आहे
मुस्लिमानां आक्रमकांच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांनी या
देशातील बहुसंख्यांक जनतेच्या डोळ्यावर मुस्लिमद्वेषाची
भगवी पट्टी बांधली आहे.बाबराचे नातलग इथे कुणी नस
ल्याचा निर्वाळा देणाऱ्यांनी रामाला मात्र राष्ट्रदैवताच्या चौ
कटीत घट्ट अडकवून टाकले आहे.समस्त भगव्या परिवारा
चे राजकारण तसेच उदरभरण फक्त आणि फक्त राम आणि
नथुराम या दोन नावावरच सुरु आहे.
         मोदींचा राजतिलक पार पडल्यापासून भाजप आणि
त्याच्या पारिवारिक तंबूमधले तमाम बाजारबुणगे महात्मा
गांधींचे चारित्र्यहनन करताना दिसताहेत.त्याचवेळी मोदी
मात्र राष्ट्रपित्याचे देशविदेशात भरपूर गुणगान करताना दि
सत आहेत याचा अर्थ काय ? संघाच्या डावपेचानुसार मोदी
आणि त्यांच्या भोवतीच्या फंटरांच्या भूमिका निश्चित झाल्या
असाव्यात त्या संघसंहितेप्रमाणेच हा मोदी आणि कंपनीचा
ड्रामा सुरु असला पाहिजे.पुढील काळात आणखी काय
काय प्रसंग,घटना देशवासियांसमोर वाढून ठेवल्यात हे
भागवताचे मोहनच जाणोत..!!